Tuesday, September 08, 2009

आयुर्वेद - पंचकर्म

आयुर्वेद - पंचकर्म
सोबतीच्या अनेक साप्ताहिक कार्यक्रमांत तज्ञ डॉक्टरांची विविध विषयांवर माहितीपूर्ण भाषणे आयोजित केली जातात. दि. १९ ऑगस्ट रोजी आयुर्वेद तज्ञ डॉक्टरांचे पंचकर्माचे महत्व सांगणारे भाषण झाले. तज्ञ डॉक्टर होत्या डॉ. श्रीमती मोहिनी गाडे, LCEH, आयुर्वेद विषेतज्ञ.
सुरुवातीला त्यानी सांगितले की पंचकर्म ही आयुर्वेदातील एक महत्वाची रोगनिवारक/रोगप्रतिबंधक क्रिया आहे. या क्रियेमुळे मानवी शरीरात उद्भवणारी (toxins) विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात आणि विषारी द्रव्यांमुळे होणार्‍या अनेक व्याधीना प्रतिबंध होऊ शकतो. पंचकर्मामध्ये खालील महत्वाच्या पांच क्रिया असतात.
बस्ती: वनौषधीयुक्त तेलाने किंवा काढ्याने देण्यात येणारा एनिमा.
विरेचन : सकाळीच तीन ते पांच दिवस तुपाचे प्राशन व नंतर शरीर मालिश व वाफेचे स्नान. शेवटच्या दिवशी रेचक दिले जाते.
वमन : प्रथम विरेचनप्रमाणेच क्रिया. शेवटच्या दिवशी वमनक्रिया (वांती) केली जाते.
नस्य: वनौषधी तेल किंवा पावडर नाकामध्ये घातली जाते.
रक्तमोचन : नसांमधील दूषित रक्त जळवा लावून काढले जाते.
शिवाय रोग्यांच्या वैयक्तिक आवश्यकतेनुसार आयुर्वेद पद्धतीने मालिश व बाष्पस्नान, शिरोधारा, उत्तरबस्ती, नेत्रतर्पण, औषधी वनस्पती पानांचे धूम्रपान, पिंडस्वेदन, कटीबस्ती, हृदयबस्ती, जानुबस्ती अशा आयुर्वेदिक पद्धतीच्या क्रियाही रोगनिवारणाला सहाय्यभूत होतात. रोग झाल्यानंतर महागडे इलाज करण्यापेक्षा लोकानी पंचकर्म करून घेतल्यास तो एक व्याधिमुक्त जीवनाकडे जाण्याचा मार्ग ठरु शकेल.

3 comments:

mannab said...

I would like to know who are eleigible to undertake this "Panchkarma" treatment under guidance from an expert in Aryuveda.
Thanks.
Mangesh Nabar

म. ना. काळे said...

श्री. मंगेश नाबर, नमस्कार.

आपल्या शहरातील आयुर्वेदिक वैद्य आपणास पंचकर्म
या क्रियेसंबन्धी मार्गदर्शन करू शकेल.

धन्यवाद.

-- म.ना. काळे

कृष्यणकुमार प्रधान said...

All from 5 to 105 years of age can take this treatment as far as I know--krishnakumar