Wednesday, April 14, 2010

भोजनांते उचितं उष्मोदकं पेयं

‘भोजनांते तक्रं’ - भोजनाच्या शेवटी ताकाचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे हे डॉक्टर/वैद्य यांचेही मत आहे. परंतु भोजनाच्या शेवटी जर कुणी थंडगार पाणी किंवा शीतपेय पीत असेल तर ते हृदयाच्या आरोग्याला प्रतिकूल आहे.

चिनी किंवा जपानी लोक भोजनामध्ये गरम चहा पिणे पसंत करतात. त्यांच्या हृदयाचे आरोग्य भारतीयांच्या तुलनेत अधिक चांगले आहे हे सर्वाना माहीत आहे.

या अनुषंगाने भोजनाच्या शेवटी ज्याना थंड पाणी पिणे आवडते त्यानी या सवयीचा फेरविचार करावा. चवदार, चटकदार भोजनानंतर थंडगार पेय किंवा पाणी पिण्याने गळा थंडगार होतो आणि माणूस उल्हसितही होतो. पण त्याबरोबर नकळत आरोग्यावर दुष्परिणामही होत असतात. कारण थंड पाणी किंवा पेय तेलकट पदार्थातील घटक अधिक घन (घट्ट) बनवते. त्यामुळे पचनक्रिया मंदावते. एकदा या चिकट पदार्थाची आम्लाबरोबर प्रतिक्रिया झाली की त्याचे विघटन होऊन तो जड अन्नापेक्षाही जलद रीतीने आतड्यामध्ये शोषला जातो. यामुळे कदाचित कॅन्सरही उद्भवू शकतो. म्हणून भोजनाचे शेवटी गरम चहा, गरम सूप किंवा किंवा गरम पाणी पिणे हिताचे ठरेल.

तळलेले फ्रेंच पद्धतीचे पदार्थ आणि बर्गर हे हृदयाच्या आरोग्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत या मताप्रत अनेक तज्ञ आले आहेत.

वरील निष्कर्ष अनेक निरीक्षणे व शास्त्रीय अभ्यासाने काढलेले आहेत. तेव्हा आपण भोजनाच्या शेवटी थंड पेय किंवा थंड पाणी पीत असाल तर आपण आपली सवय बदलू शकता. शेवटी निर्णय तुमचा, फायदाही तुमचा.

(एका हितचिंतकाकडून आलेल्या ई मेलच्या आधारे)

-- म.ना. काळे
********

2 comments:

Anonymous said...

KAKA TUMHI KHUP CHHAN MAHITI DILI AHE.MI NAKKI ASA PRAYATNA KAREN.

कृष्यणकुमार प्रधान said...

factors causing cancer are not yet scientifically proved.Any opinion in this respect without giving the name of any authorised source, is ,in my opinion, uncalled for. As a general advice,your statements such as o not drink cold water immediately after meals, is always welcome and we are thankful for that.