Tuesday, April 20, 2010

तिमिर, दीप आणि प्रकाश

सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद व भाषा व्यासंगी लेखक व कवी श्री. प्रभाकर भिडे
यांची एक अर्थपूर्ण कविता.


निरोप द्याया काळोखाला
दीप लाविता प्रकाश उजळे ।
हे तर घडते सदैव नेमे ॥
शुभ कार्याला दिवा हवा जरी
मृत्यूनंतर दिवा लावती ।
अर्थ असे की दुःखा विसरुनी
पुढील जीवना सामोरे व्हा ॥
शृंगाराला अर्थ येतसे
दीप मालवुनी सार्थक मीलन ।
म्हणुनी लावुया अर्थ नवा ॥
फुंकर मारुनि दीप विझविला
प्रकाशमय जग सारे झाले ॥

--- कवि: प्रभाकर भिडे

No comments: