Wednesday, April 07, 2010

बाणभट्टाची कादंबरी




सौ. सुनिता जयंत खरे या संस्कृत हा विषय घेउन एम.ए. ला मुंबई विद्यापीठात प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. आज निवृत्तीनंतरही त्यांचे संस्कृतचे वाचन व मनन चालूच आहे.

सम्राट हर्षवर्धनाने ज्याला ‘वश्यवाणी कविचक्रवर्ती’ हे बिरुद बहाल केले होते तो वर्णनसम्राट बाणभट्ट आणि त्याची अजरामर गद्य कलाकृति ‘कादंबरी’ ह्यावर ‘सोबती’मध्ये सौ. सुनिता खरे यानी २४ मार्च २०१० रोजी यानी रसग्रहणात्मक व्याख्यान दिले. कादंबरीबाबत अभ्यासकांकडून घेतले जाणारे आक्षेप म्हणजे भाषा अत्यंत क्लिष्ट आहे इत्यादिबाबत त्यानी सविस्तर विवेचन केले. कादंबरी या साहित्यकृतीवरूनच गद्य पद्यापक्षा सरस असू शकते याचा प्रत्यय रसिकाना आला आणि ‘गद्यं कवीनां निकषं वदन्ति’ ही उक्ती अस्तित्वात येउन गद्यलेखक बाणभट्ट हा महाकवी गणला गेला ह्याबाबतचे त्यांचे विश्लेषण मार्मिक व रसाळ होते
--------

No comments: