Tuesday, March 23, 2010

अमुल्य पाणी – पाणी म्हणजेच जीवन – जपून वापर करा

मानवासह जमिनीवरील सर्व सजीवांना मिळून , पृथ्वीवरील असलेल्या एकूण पाण्यापैकी , अवघे १% पाणी उपलब्ध आहे . अर्थात , योग्य पद्धतीने वापरले तर एवढेसे पाणीही आपल्याला पुरून उरेल इतके आहे .
कपडे धुणे , भांडी घासणे , स्वयंपाक करणे , पीण्याकरिता व स्वच्छतेकरिता लागणारे पाणी हीच आपली पाण्याची गरज असे आपण समजतो . ही झाली प्रत्यक्ष गरज . पण , दैनंदिन व्यवहारात लागणारी प्रत्येक गोष्ट तयार होण्यासाठी प्रचंड प्रमाणात पाणी लागते . ही आहे अप्रत्यक्ष गरज .
ही गरज किती मोठी आहे ते पहा –
१ लिटर दूध : १००० लिटर , १ कप चहा : ३० लिटर , १ कप कॉफी : १४० लिटर ,
१ कि. ग्रॅ. तांदूळ : ३४०० लिटर , १ कि. ग्रॅ. गहू : १३०० लिटर , १ कि. ग्रॅ. मका : ९०० लिटर ,
१ सफरचंद : ७० लिटर , १ कि. ग्रॅ. चीज : ५००० लिटर , १ पावाची स्लाईस : ४० लिटर ,
१ कि. ग्रॅ. चिकन : ३९०० लिटर , १ कि. ग्रॅ. बकरीचे मांस : ४००० लिटर ,
१ कि. ग्रॅ. डुकराचे मांस : ४८०० लिटर , १ कि. ग्रॅ. मेंढीचे मांस : ६१०० लिटर ,
१ कि. ग्रॅ. गायीचे मांस : १५५०० लिटर , १ कि. ग्रॅ. कापूस : ११००० लिटर ,
१ टी. शर्ट : २७०० लिटर , १ ए-४ कागद : १० लिटर .
लक्षात ठेवा – पाणी : वस्तू आहे गरजेची ; नव्हे चैनीची !
पाणी वाचवा – अर्थातच आपली जीवनशैली तपासून आणि सुधारून !

(सौजन्य – गतिमान संतूलन >> आंदोलन शाश्‍वत विकासासाठी – साभार )

No comments: