Tuesday, October 27, 2009

एक दिवसाच्या सहलीकरिता वसईला भेट हा एक चांगला पर्याय आहे

पहाटे आणि सायंकाळीं येथे फिरायला येणार्‍यांची संख्या कमी नाही. हा समुद्राचा भाग डुंबण्याकरिता सुरक्षित आहे. उधाण नसलेल्या वेळी समुद्रावर वाळूवरून दूरवर चालत जाता येते.
वीस रुपयांत घोड्यावरून किनार्‍यावर फेरी मारता येते.

माणशी दहा रुपयांत किनार्‍यावर घोडागाडींतून रपेटही मारता येते.


सुरू व समुद्र यांच्या सानिध्यात भेळवाला का नसावा ?


समुद्राच्या लाटांनी किनार्‍याची धूप चालू आहे. त्यामुळे सुरुची बरीच झाडे उन्मळून पडलेली दिसतात.




किनार्‍यावर पोहोचल्यावर सुरूचे प्रेक्षणीय बन दिसते. महाराष्ट्रात, उत्तरेला बोर्डीपासून दक्षिणेला [ मुंबई वगळता] बांद्यापर्यंत, बहुतेक सर्वत्र, किनार्‍यावर सुरूची बने दिसतात.
सुरूच्या बागेकडे जाणार्‍या रस्त्यावर खूप झुडुपे व टिवरीची झाडे आहेत. सध्या फुलपांखरांच्या विणीचा हंगाम आहे. झुडुपांवर खूपशी फुलपांखरे पहावयास मिळतात. टिवरींवर छोट्या समुद्रपक्ष्यांची किलबिल ऐकू येते. पण फारशे पहावयास मिळत नाहीत. दडून असतात.
एक दिवसाच्या सहलीकरिता वसईला भेट हा एक छान पर्याय आहे.
पार्ल्याहून लोहमार्गाने वसई गांवांत साधारणत: एक तासांत पोहोचता येते. तर रस्त्याने दीड तासांत.
वसईचा किल्ला [ हा वसई खाडीवर आहे ], समुद्रकिनारा, भुइगांवचा स्वामी समर्थ मठ, निर्मळ [ दक्षिण काशी ] येथील शंकर मंदीर, गिरीजच्या हिरा डोंगरीवरील दत्त मंदीर, नायगांव [ कोळीवाडा ] येथील वाल्मिकी मंदीर, खोचिवडे [ कोळीवाडा ] येथील मंदीर, ख्रिश्चन चर्चेस ही स्थाने पहाण्याजोगी आहेत. गांवांतून आंतल्या रस्त्याने फेरफटका मारताना वाटेतील छोटेखानी बंगले व सभोवतालच्या लहानमोठ्या बागा पहाणे हा एक सुखावह अनुभव आहे.
समुद्रकिनार्‍यावर सुरूच्या झाडांची लागवड आहे. या भागाला सुरूची बाग असेच म्हणतात. वाहन एक ठरावीक अंतरापर्यंत जाते. पुढे सुमारे एक कि. मि. चालावे लागते.